मुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.
कंपनीच्या फ्लॅगशिप प्रशिक्षणार्थी कार्यक्रमासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत भारतातील सुमारे ६०० इंजिनीअर्सनी यात सहभाग घेतला. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या उद्योगक्षेत्रातील अग्रक्रमामुळे सध्या आघाडीच्या आयआयटींमध्ये चाललेल्या कॅम्पस् प्लेसमेंट सीझनमध्ये कंपनीला पहिल्या व दुसऱ्या दिवशीचे स्लॉट्स देण्यात आले.
नव्याने पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना रचनाबद्ध प्रशिक्षण, आंतर-कार्यात्मक प्रकल्प आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या यांच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापन व व्यवसाय नेतृत्वासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम संस्थांमधून प्रशिक्षण प्राप्त करण्याच्या संधींचाही समावेश आहे.
म्हणाले, ‘आमच्या भविष्यकाळावर लक्ष केंद्रित करणाऱ्या धोरणांसाठी आम्हाला सृजनशील, कामावर प्रेम करणाऱ्या व महत्त्वाकांक्षी अशा तरुण प्रतिभेची गरज आहे. आमच्या वाढत्या व्यवसायाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी, तसेच वाढलेली जटीलता हाताळण्यासाठी आम्ही सातत्याने उच्च दर्जेच्या प्रतिभेला आकर्षित करून घेत आहोत. आमच्या प्रतिभा संपादन धोरणाला पूरक ठरावे म्हणून आम्ही देशातील अव्वल दर्जाच्या संस्थांशी अध्ययन व विकास उपक्रमांसाठी सहयोग केला आहे. भारतातील एक आघाडीची संरचना कंपनी म्हणून आमचा भर केवळ प्रतिभेचा संचय वाढवण्यावर नाही, तर त्याचा दर्जा व उत्पादनक्षमता सातत्याने सुधारत राहण्यावरही आहे. यामुळे वाढही योग्य रितीने होईल आणि सर्व संबंधितांना लाभ होऊन भारताच्या प्रगतीचा वेग वाढण्यातही मदत होईल.’